कबीराचे दोहे
*कबीराचे दोहे*
कबीराचे दोहे
आहे सुदामाचे पोहे.
प्रेमाणे आणलेली शिदोरी.
एका घासात सर्व भुख मिटविणारी .
गरीब - श्रीमंतीची भेद तोडणारी .
राजा -रंक यांच्यातील दरी मिटविणारी.
पाची पंकवाणाला फिकी पाडणारी.
एक एक दोहा जीवन जगण्याचे तत्वद्यान सांगते .
सांगा आणखिन तुम्हास काय लागते ???
*"'+()#₹%@;^$£¢£÷×¶}=£
दुसऱ्याच्या दुर्गुणाकडे लक्ष न देता.
स्वतःच्या दोष मिटविण्याची दवा .
जीवंतपणीच आईवडीलाची सेवा करा .
मेल्या नंतर आईवडिलाना कावळा बनवु नका.
पोथी वाचुन कोणी या जगात पंडीत होत नाही .
प्रेमाचे अडीच अक्षर जो समजुन घेतो तोच खरा पंडित .
दगडाच्या सापाला दुध पाजतात व जीवंत सापाला काठीने मारतात.
निंदकाला आपल्या सोबत ठेवा जर नसेल तर त्याला घरा समोर एक घर बांधुन द्या .
बिना साबण तो तुम्हाला निर्मल करले.
उद्या जे काम करायचे असेल ते आज करा आज जे काम करायचे असेल ते आता.
ज्या वेळेस आपले वाईट चालु असते त्यावेळेस आपल्याला परमेश्वर आठवतो व चांगले चालु असताना कोणीच नाही आठवत.
चांगले चालु असतानाच परमेश्वराची आठवण ठेवा त्यामुळे वाईट वेळ येणारच नाही.
कवि/ लेखक
✍विजय नामदेव त्रिभुवन
मुकूंदवाडी औरंगाबाद
मो .नं.8605895244
Comments
Post a Comment