दुष्काळ
भरारी प्रिमियर लिग या स्पर्धेसाठी पहिल्यादाच
अष्टांक्षरी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फेरीला बाप या विषयावर अभंग लिहिला होता.
दुष्काळ
मदत न करण्याचा
हमीभाव न देण्याचा
वीज पाणी न देण्याचा
खरे खत न देण्याचा ||1||
हुंडा न घेता लग्नाचा
धार्मिक कर्मकाडाचा
कुंभमेळा करोडोचा
लाखोच्या जाहिरातीचा ||2||
वृक्षतोड करण्याचा
खोटे झाडे लावण्याचा .
खोट्या चारा छावण्याचा.
लवासा उभारण्याचा .||3||
किसान ,जवान जय
फसवेच नारे हाय.
पदवी बळीराज्याची
गतच फसवायची.||4||
विजय नामदेव त्रिभुवन
मो नं. ८६०५८९५२४४
Comments
Post a Comment